Rahul Gandhi : ‘सरकार देशाची नैसर्गिक संपत्ती विकत आहे’; राहुल गांधींचा हल्लाबोल, ग्रेट निकोबार प्रकल्पावरून केंद्रावर गंभीर आरोप
काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रेट निकोबार विकास प्रकल्पावरून पंतप्रधान Narendra Modi आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार विकासाच्या नावाखाली देशाची नैसर्गिक संपत्ती, जंगलसंपदा आणि आदिवासींचे हक्क धोक्यात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.