Rahul Gandhi : ‘मोबाइलवरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या, हा सरळसरळ घोटाळा’; राहुल गांधींचा सीबीएसईवर गंभीर आरोप
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करण्यासाठी निर्धारित तांत्रिक निकष बदलण्यात आले आणि त्यानंतर लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका मोबाईल फोनच्या माध्यमातून स्कॅन करण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणाला थेट “फसवणूक” आणि “घोटाळा” असे संबोधत स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.