Rift in Congress : ‘मध्य-पूर्व युद्धा’वर काँग्रेसचे 4 बडे नेते सरकारसोबत; राहुल गांधींपेक्षा मांडले वेगळे मत; LPG संकटावर फक्त वातावरण तयार केल्याचा खुलासा
काँग्रेसचे चार मोठे नेते मध्य पूर्व युद्ध आणि एलपीजी संकटावर पक्षाच्या भूमिकेपासून वेगळे बोलत आहेत. यामध्ये कमलनाथ, आनंद शर्मा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचा समावेश आहे. एकीकडे राहुल गांधी या मुद्द्यांवर थेट पंतप्रधानांचे नाव घेऊन टीका करत आहेत.