• Download App
    CM Fadnavis | The Focus India

    CM Fadnavis

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 10 वर्षांचे अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात दूर झाले आणि हे एअरपोर्ट तयार झाले.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज्यासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न; ऊर्जेच्या स्रोतांमध्ये परिवर्तन आवश्यक; ‘फ्लेक्स-इंजिन’नंतर सीएनजी मोठा बदल

    सध्या जगासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न असून, याचे थेट परिणाम मराठवाड्यात जाणवत आहेत. यंदा मे महिन्यात पावसाळा सुरू होऊन ऑक्टोबरमध्येही पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सात-सात वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, केवळ पिकेच नव्हे तर जमिनीही खरडून गेल्यामुळे रबीचे पीक घेणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करणे अत्यावश्यक असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा- ओल्या दुष्काळाच्या सर्व सवलती लागू; पुढच्या आठवड्यात निर्णय, ई-केवायसीची अट शिथिल

    महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यापूर्वी राज्यात केव्हाही ओला दुष्काळ जाहीर झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच दुष्काळ काळात लागू करण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजना सध्याच्या काळात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे ते म्हणाले. सरकारकडून करण्यात येणारी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पोहोचती केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले.

    Read more

    CM Fadnavis : अहिल्यानगरात रांगोळीवरून तणाव; सीएम फडणवीस म्हणाले- सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर शासन करणार

    राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील धार्मिक मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावाववर भाष्य करताना म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अहिल्यानगर प्रकरणात कडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना

    महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात तर अक्षरशः ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

    Read more

    CM Fadnavis : NDRF मधून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री शहांकडे मागणी

    राज्यात विशेषतः मराठवाड्यात यंदा पावसामुळे धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत यंदा अतिवृष्टी झाली असून, त्यात अमाप नुकसान झाले आहे. विशेषतः त्यात जवळपास 84 जणांचा बळीही गेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारकडे हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईत आले असता त्यांच्याकडे देखील मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : पंतप्रधान म्हणाले उद्यापासून बचत महोत्सव; हे देशातील क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री फडणवीसांची नवीन जीएसटी धोरणावर प्रतिक्रिया

    देशात आता नवीन जीएसटीचे दर उद्यापासून (22 सप्टेंबर) लागू होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नवीन जीएसटी धोरणावर भाष्य केले आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयासह जीएसटी बचत महोत्सव सुरू होईल. समाजातील सर्व घटकांना याचा फायदा होईल. पंतप्रधानांनी जनतेला फक्त देशवासीयांच्या कठोर परिश्रमातून बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून हे देशातील क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    राज्यात ‘ग्रीन स्टील’मध्ये ₹80,962 कोटींच्या गुंतवणुकीतून 90,300 रोजगार निर्मिती सुनिश्चित; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे ‘एआयआयएफए स्टीलेक्स 2025 – अ स्टील महाकुंभ’ चे उदघाटन संपन्न झाले.

    Read more

    CM Fadnavis : सीएम फडणवीसांनी केली पडळकरांची कानउघाडणी, म्हणाले- आक्रमकपणा दाखवताना भान राखण्याची गरज

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी कळवली. त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत, असे ते म्हणालेत.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- हैदराबाद गॅझेटमुळे OBC आरक्षणाला धक्का नाही; फक्त नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळेल

    मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आणि आंदोलकांमध्ये झालेल्या यशस्वी तोडग्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सरकारने मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याची सरकारची सुरुवातीपासूनची तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट आरक्षणाची मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नव्हती. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता, ‘सरसकट’ आरक्षण देणे शक्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    Read more

    CM Fadnavis : ठाकरे बंधूंना एकत्र राहण्याची सुबुद्धी मिळो; मुख्यमंत्री फडणवीसांचे अमेरिकेच्या टॅरिफवरही भाष्य

    गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विविध विषयांवर भाष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले 50 टक्के टॅरिफ आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “श्रीगणेशाने दोन्ही भावांना सुबुद्धी दिली आहे. त्यांनी कायम एकत्र राहावे, अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो,” असे फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भारत ट्रम्प यांच्या टॅरिफला नक्कीच तोंड देईल आणि या आव्हानाला संधीमध्ये बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    Read more

    CM Fadnavis : माधुरी हत्तिणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार; राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा येथील नांदणी मठातील माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- महाराष्ट्रात मराठी-अमराठीचा वाद नाही; निशिकांत दुबेंना वादग्रस्त न बोलण्याचा सल्ला

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मराठी – अमराठीच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आपले तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रात मराठी व अमराठी माणूस सुरक्षित आहे. इथे कोणताही वाद नाही. काहीजण या प्रकरणी मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मराठी जनता त्यांना निवडणुकीत त्यांची योग्य जागा दाखवेल. त्यामुळे दुबे यांनी या प्रकरणी कोणतीही विधाने करून नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    CM Fadnavis : भाषावादावर CM फडणवीसांचे स्पष्ट मत- मराठीचा अभिमान हवा, पण हिंसा नको, मराठी माणूस इतका संकुचित नाही

    मराठी आणि हिंदी भाषिक वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत संतुलित आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठी माणूस संकुचित नाही, तो संस्कारी आहे, अभिमानी आहे; मात्र हिंसक नाही, असे सांगत त्यांनी राज्यात सुरू असलेल्या भाषिक वादावर भाष्य केले. जो कोणी मुंबईत येईल, त्याचे स्वागत आमचा महाराष्ट्र करेल. तसेच भाषेच्या किंवा धर्माच्या आधारे कुणालाही लक्ष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    CM Fadnavis : पुण्यातील दादागिरी विकासातील सर्वात मोठा अडथळा; मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘दादांना’ इशारा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगांच्या वाढत्या दादागिरी बद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पुण्याच्या विकासातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. तसेच, अशा दबावामुळे उद्योगपतींच्या खर्चावर आणि व्यवसाय धोरणावर परिणाम होतो, ज्यामुळे ते जागतिक स्पर्धेत टिकू शकत नाहीत.

    Read more

    CM Fadnavis : मेळावा झाला म्हणून प्रक्षोभक पोस्टचे स्वातंत्र्य मिळते का? यवत तणावावर मुख्यमंत्र्यांची नाराजी; अजित पवारांची घटनास्थळी पाहणी

    पुण्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले होते. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस मालेगाव निकालावर म्हणाले- UPA चे षडयंत्र उघडे पडले, काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी

    विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी या निकालावर भाष्य करताना केला. काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

    Read more

    CM Fadnavis : ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे; CM फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध

    काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा असे संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा सेनेचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला.

    Read more

    CM Fadnavis : महाराष्ट्र सरकारतर्फे दिव्या देशमुखचा सन्मान करू; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- फायनलमध्ये दोन्ही खेळाडू भारतीय असल्याचा अभिमान

    नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला आहे. अंतिम फेरीत टाय-ब्रेक फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करून तिने हे विजेतेपद पटकावले. विश्वविजेतेपद मिळवण्यासोबतच ती भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- माणिकराव कोकाटेंचे बोलणे चुकलेच, त्यांनी काहीही सांगितले तरी आमच्यासाठी भूषणावह नाही!

    : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. माणिकराव कोकाटे यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. पण त्यांनी काहीही सांगितले असले तरी ते आमच्यासाठी भूषणावह नाही, असे फडणवीस म्हणाले.

    Read more

    Legislature Session : विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजले; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी हनीट्रॅपचा आरोप फेटाळला

    राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी (18 जुलै) शेवटचा दिवस होता. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी झाली. त्याचे तीव्र पडसाद शेवटच्या दिवशी सभागृहात उमटले. विरोधकांनी या मुद्यावरून टीकेची झोड उठवत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने तेवढ्याच शिताफीने त्यांचा डाव उधळवून लावला.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत नाराजी; हाणामारीच्या घटनेने एकाची नव्हे इथल्या प्रत्येकाची प्रतिमा मलिन!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या परिसरात गुरूवारी झालेल्या हाणामारीवर तीव्र संताप व्यक्त केला. कालच्या घटनेमुळे कुणा एकाची प्रतिष्ठा गेली नाही. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. आज या ज्या शिव्या बाहेर पडत आहेत, त्या एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते की, हे सगळे आमदार माजले म्हणून, असे ते म्हणालेत.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- धर्मांतर करून मिळविलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार; जबरदस्तीने धर्मांतर होऊ नये याची तरतूद करू

    अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच मिळू शकतो. अन्य धर्मीय त्यासाठी पात्र नाहीत, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी दिला आहे. या अनुषंगाने धर्मांतर करून घेतलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. तसेच कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर करता येणार नाही याची तरतूद करू, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिले.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभा अध्यक्षांना विनंती- विधानभवनात अशा घटना योग्य नाहीत; कारवाई झालीच पाहिजे

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या आवारातच जोरदार हाणामारी झाली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

    Read more

    CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांची घोषणा- गुणवत्तापूर्ण बियाणे; कृषी यंत्रणा सक्षम करणार, विभागाला तपासणीचे अधिकार

    शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल, यात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

    Read more