चापेकरांच्या बलिदानातून स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी, देशात उभी राहिली क्रांतिकारकांची फळी!!
अत्याचारी आयन रॅंडच्या वधानंतर फाशीवर जाताना चापेकर बंधूंना क्षणभरही पश्चाताप झाला नाही अथवा भिती वाटली नाही. त्यांच्या बलिदानातून देशात क्रांतिकारकांची मोठी फळी उभी राहिली. पण दुर्दैवाने आपल्याला आज बोटावर मोजण्याइतकेच क्रांतिकारक परिचित आहे, अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतिकारकांच्या बलिदानाचा मोठा वाटा आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नांतून अपरिचीत अशा साडे बाराहजार क्रांतिकारकांची गाथा देशासमोर येत असल्याचेही ते म्हणाले.