अजून किती काळ तुम्ही हवेत बाण सोडत राहणार? ; फडणवीसांचा राहुल गांधींना नेमका सवाल!
राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या काही विजयी आमदारांच्या मतदारसंघाचे दाखले देत मोठा डाव टाकला
राहुल गांधींच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी विरोधी पक्षाच्या काही विजयी आमदारांच्या मतदारसंघाचे दाखले देत मोठा डाव टाकला
महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संकलित केलेली माहिती सरकार लवकरच सर्वांसमोर ठेवणार आहे. अशा लोकांना शोधण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने, सरकार जाणूनबुजून ही माहिती सार्वजनिक करत नाही, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘बलरामपूर बायोयुग’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, “आज आपल्या पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर ‘बायोयुग’ हा पर्याय असून यातील पीएलए (पॉली लॅक्टिक अॅसिड) हे समाधान आहे.
भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअपशक्ती बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स उदयाला आलेत. त्यामुळे भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल, असे ते म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन, मुंबई येथे ‘सन 2024-25 वर्षासाठीच्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या सर्व समित्यांचे एकत्रित उदघाटन’ संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
भारतीय सेनेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर यशस्वीपणे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय सेनेचे आभार मानण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर या रॅलीचा समारोप झाला.
मागील काळात अडीच वर्षे अडचणी आल्या होत्या. त्या काळात मेट्रो शेडचा देखील वाद उभा राहिला होता. त्या सर्व अडचणींवर मात करून आता आपली मेट्रो अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तो अडीच वर्षांचा काळ नसता तर मुंबईची मेट्रो किमान एक ते दिड वर्षे आधी पूर्ण झाली असती, असा टोला देखील त्यांनी लगावला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्य काळावर निशाणा साधला आहे.
जातीनिहाय जनगणनेला मोदींनी मान्यता दिल्यामुळे सामाजिक न्यायाचे नवीन पर्व सुरू झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर हा निर्णय भविष्यात जातीव्यवस्था संपूर्णतः संपुष्टात आणण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून केंद्र सरकारचे आभार मानले आहे. यासोबतच या निर्णयावर काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची ‘सहन होत नाही, आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था होणार असल्याची टीका शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र जलसंधारण महामंडळा’ची आढावा बैठक पार पडली. राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार व पाण्याच्या लेखा जोखाच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी व योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामे हाती घेण्याचे धोरण राबविण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री यांनी सांगितले की, राज्यात रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ‘विकासाच्या इकोसिस्टीम’मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून 2028 पर्यंत प्रवास शक्य होईल. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाईल.
महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. हिंदीच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र देखील पाठवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे ’22वा मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी 2025 पुरस्कार सोहळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व सर्वसमावेशक करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्रांपासून ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंतच्या संस्थांचे बळकटीकरण ‘मिशन’ मोडमध्ये राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, राज्यातील नागरिकांना किमान 5 किमीच्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे महापारेषण प्रलंबित प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
प्रकल्पग्रस्तांना एक महिन्यात सानुग्रह अनुदान वितरित करण्यासही सांगतिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवाद कार्यक्रमाने नाशिक येथे कॉन्फडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप झाला. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा ठोस रोडमॅप सादर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे ‘महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची (MSIDC)’ आढावा बैठक पार पडली. एमएसआयडीसी रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी काम करणारी संस्था आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा केली.
केंद्र शासनाने ० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून अशा ग्राहकांना ‘ रूट टॉप सोलर’ पॅनल देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेला सहाय्यकारी असणारी राज्याची स्वतंत्र योजना शासन आणणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली.
मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्या कामाला स्थगिती या माध्यमांच्या लाडक्या बातम्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी विरोधकांना आणि माध्यमांना टोला हाणला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे गुरुवारी ‘स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉनक्लेव्ह’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पेस टेक आपल्या जीवनाचे अभिन्न अंग होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुला’चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासमवेत रविवारी महाड, रायगड-अलिबाग येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, न्यायालय नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन केले. याप्रसंगी मान्यवरांनी वृक्षारोपण केले व माजी न्यायाधीश डॉ. यशवंत चावरे यांच्या ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ’35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा – 2025′ समारोप समारंभ पार पडला. यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष पोलीस संघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.