भारतात पेट्रोल, डिझेल आणि इंधन तेलाची कमतरता नाही; केंद्र सरकारचे लोकसभेत निवेदन
भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित आहे,” असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत सांगितले. पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीत भारताच्या ऊर्जा पुरवठ्याच्या परिस्थितीवर त्यांनी लोकसभेत निवेदन केले. युद्ध परिस्थितीत भारतात पेट्रोल, डिझेल, रॉकेल, एटीएफ किंवा इंधन तेलाची कोणतीही कमतरता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.