Maharashtra; Govt : अवकाळी पावसाचा मोठा फटका; राज्यातील 56 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, सरकारकडून मदतीची तयारी
राज्यात मे अखेरपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार राज्यातील सुमारे 56 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून, अंतिम अहवालानंतर मदत जाहीर केली जाणार आहे.