Jaishankar : बांगलादेशच्या नकाशात भारताच्या 7 राज्यांचा भाग; संसदेत प्रश्न उपस्थित, जयशंकर म्हणाले- प्रकरणावर बारकाईने लक्ष
बांगलादेशच्या वादग्रस्त नकाशाचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला. भारतातील पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, बिहार, झारखंड आणि ओडिशा या ७ राज्यांचे काही भाग बांगलादेशच्या नकाशात दाखवण्यात आले आहेत. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी राज्यसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.