Anurag Thakur : अनुराग ठाकूर म्हणाले- गरज असते तिथे राहुल गांधी नेहमीच दांडी मारतात; भारत विरोधासाठीच गांधी अग्रेसर
विरोधी पक्ष भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली. १० वर्षे विरोधी पक्षनेतेपद रिकामे होते. या वेळी त्यांना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र ते देशाला गरज असते तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.