Manoj Jarange Patil : 15 तासांनंतर मनोज जरांगेंचे उपोषण मागे; सरकारकडून सर्व प्रमुख मागण्या मान्य, राधाकृष्ण विखे पाटलांची शिष्टाई यशस्वी
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे पाटील यांनी १५ तासांनंतर मागे घेतले. सरकारसोबत झालेल्या मध्यरात्रीच्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्याने त्यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.