CM Fadnavis : मेळावा झाला म्हणून प्रक्षोभक पोस्टचे स्वातंत्र्य मिळते का? यवत तणावावर मुख्यमंत्र्यांची नाराजी; अजित पवारांची घटनास्थळी पाहणी
पुण्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले होते. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.