अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल बाहेर; विकसित बारामतीत विमानतळावर सुरक्षेच्या गंभीर त्रुटी!!
अजित पवारांच्या विमाना अपघाता संदर्भात DGCI ने आपला प्राथमिक अहवाल आज जाहीर केला त्यामध्ये 22 पाने आहेत.
अजित पवारांच्या विमाना अपघाता संदर्भात DGCI ने आपला प्राथमिक अहवाल आज जाहीर केला त्यामध्ये 22 पाने आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह 70 जणांना विशेष न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्यामुळे या सर्वांना आता अधिकृतपणे ‘क्लीन चिट’ मिळाली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही काही शंका व्यक्त करण्यात आल्या.
अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी अजित पवारांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली. त्यावर बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याविषयीचा पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.
अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??, असा सवाल समोर आलाय.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालात शिंदे सेनेला मागे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आल्याचा भास, पण हा तर वस्तुस्थितीचा विपर्यास!!,
जिल्हा परिषद निवडणुकीत पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर निकालांपैकी 43 जागा जिंकल्या. त्यांनी बहुमताचा आकडा आधीच पार केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 तारखेला, बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, राज्यभर शोककळा पसरली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!, हे राजकीय वास्तव अजितदादांना निरोप देण्याच्या दिवशी समोर आले.
अजितदादांचा राजकीय वारस एकटे शरद पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??, हा खरं तर “सवालच” नाही.
आम्ही दोघे मंगळवारी (दि. २७) मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली
आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत वेदनादायी, धक्कादायक दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी प्रचंड मोठा आहे.
बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोकलहर पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोरकेपणाची भावना आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि हजारो कार्यकर्त्यांना अश्रू आवरले नाहीत. सगळे शोक सागरात बुडाले.
अजित पवार आपल्या राजकीय कर्मभूमीत बारामती मध्येच विमान अपघातात कालवश झाले. एक अत्यंत कार्यक्षम पण वादग्रस्त नेत्याची अचानक political exit झाली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार बारामती जवळ विमान अपघातात कालवश झाले. सकाळी 8.45 वाजता झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला जबर धक्का बसला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तब्बल 40 वर्षे राजकीय मुशाफिरी करणारा नेता विमान अपघातात अचानक कालवश झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळ देखील शोकात बुडाले.
महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारमध्ये भाजपने अजित पवारांच्या वाटाल्या दिलेल्या सत्तेच्या तुकड्याला आतून आणि बाहेरून असा दोन्हीकडून सुरुंग लावण्यात आल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींमधून उघड झाला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये फटका खाल्ल्यानंतर अजित पवार बनले “मवाळ”; पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत करत आहेत
29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. पण त्या पलीकडे जाऊन महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, पण त्यात अजितदादांचा सहभाग नगण्य असेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच निर्णायक भूमिका बजावतील.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका अजित पवार हरले. त्यांनी महायुती मधला वरिष्ठ नेत्यांचा वादा तोडून भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली त्यांना भ्रष्टाचारी ठरविले.
महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालात आश्चर्यकारक असे काहीच घडले नाही मुंबईत ठाकरे बंधूंची सत्ता गेली, तर पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे हे निवडणुकीच्या साठी एकत्र आले पण प्रत्यक्षात त्यांना पराभवाचेच तोंड पाहावे लागले.
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत २५ वर्षांपूर्वीच्या सिंचन प्रकल्पावरून नवा राजकीय वाद पेटला आहे. १९९९ मधील भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या काळात ‘पार्टी फंडा’साठी प्रकल्पांची किंमत वाढवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मात्र, अजित पवारांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार पलटवार केला असून, “एवढी वर्षे तुम्ही भ्रष्टाचाराची माहिती दडवून ठेवली, म्हणजे तुम्हीही त्यात सामील आहात का?” असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित करत, तुमच्याकडची फाईल आता सार्वजनिक कराच, असे आव्हान अजित पवारांना दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ या कार्यालयात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात सुरुवातीला मोठी खळबळ उडाली होती. मात्र ही कोणतीही अधिकृत पोलिस कारवाई नसल्याचे स्पष्टीकरण पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पोलिसांच्या या पथकाकडून कार्यालयातील कागदपत्रांची केवळ प्राथमिक पाहणी केली जात असल्याची माहिती समोर येत असली तरी, नरेश अरोरा यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणाबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.
महापालिका निवडणुकीला काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी खदखद व्यक्त केली आहे. मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजित दादांनी ते पाळले नाही, असे फडणवीस म्हणाले. तसेच अजित दादांना दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला जायचे असेल तर ते जाऊ शकतात. त्यांना विमान सुद्धा देण्याची व्यवस्था मी करेन, तिकीट सुद्धा काढून देईल. जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.
सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!, असे आज पुणे महापालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी अजितदादांना तुतारीचे आमदार बापू पठारे यांच्या मुलाला सांगावे लागले, की तुझ्या बापापेक्षा माझा काका फार मोठा आहे!!