Ajit Doval : NSA डोवाल म्हणाले- युद्धाचा उद्देश शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणे; देशाची सुरक्षा फक्त लष्कराच्या ताकदीने ठरत नाही
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मंगळवारी सांगितले की, देशाची सुरक्षा केवळ त्याच्या लष्करी सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर जनतेची इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची असते. देशाची ताकद मोजताना लोकांच्या मनोबलाकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी चूक आहे.