महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर; १०००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, १५०००० रोजगार संधींची निर्मिती
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विश्वात आज महाराष्ट्राने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण २०२६ जाहीर केले. यातून राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती होणार आहे.