Agriculture Minister Bharne : कृषिमंत्री भरणे म्हणाले- राज्यात अतिवृष्टीमुळे 66 लाख एकरांचे नुकसान, दिवाळीपूर्वी भरपाई देणार
राज्यात अतिवृष्टीमुळे ६६ लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये. या संकटाच्या काळात राज्य शासन आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे, येत्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.