Fadnavis : “काँग्रेसच्या नेतृत्वात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य विसरता येणार नाही”; शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाजन यांच्यावर टीका करत, अशा विधानांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत शरद पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.