• Download App
    वन्यप्राणी दत्तक घेण्याची योजना पुन्हा सुरु ; मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा उपक्रम Wildlife adoption Program is started Again by Sanjay Gandhi National Park of Mumbai

    वन्यप्राणी दत्तक घेण्याची योजना पुन्हा सुरु ; मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा उपक्रम

    वृत्तसंस्था

    मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने (एसजीएनपी) नागरिक, कॉर्पोरेट्स आणि संस्थांना पुन्हा सिंह, वाघ, बिबट्या, राखट ठिपक्यांची मांजरी, निलगायी, हरिण यासारख्या वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यास आमंत्रित केले आहे. त्यासाठी प्राण्यांचा खर्च उचलण्यासाठी इच्छूक नागरिकांकडून वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. Wildlife adoption Program is started Again by Sanjay Gandhi National Park of Mumbai

    गेल्या वर्षी केंद्रीय मध्यवर्ती प्राणी प्राधिकरणाने मंजूर केलेल्या या योजनेत वर्षाकाठी एकूण १६.६ लाख रुपये शुल्क आकारून २० वन्यप्राणी दत्तक देण्यात आले आहेत. देशातील बचाव केंद्रे आणि प्राणी उद्यानांना आर्थिक सहाय्य करणे आणि पळवून लावलेल्या प्राण्यांच्या संवर्धनाबद्दल जनजागृतीसाठी या योजनेला एक व्यवहार्य पर्याय म्हणून पाहिला जात आहे.



     

    या योजनेनुसार वाघासाठी वार्षिक शुल्क १० लाख रुपये, सिंहासाठी ३ लाख रुपये, बिबट्या १.२० लाख रुपये, राखट मांजरी ५०,००० रुपये, निलगायीला ३०,००० रुपये, हरिणांना २०,००० रुपये आणि बार्किंग हिरणांना १०,००० रुपये शुल्क आकारले जाईल. हा पैसा जनावरांच्या संगोपनासाठी वापरला जातो. आठवड्यातून एकदा शुल्काशिवाय दत्तक जनावरांना विनाशुल्क पाहण्याची संधी संबंधितांना मिळते.

    कर्नाटकातील बानेरघट्टा राष्ट्रीय उद्यान आणि मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पावरून वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आणले आहेत. २००३ ते २००५ या काळात मानवी-बिबट्या संघर्ष शिगेला पोचला होता. मुंबई आणि आसपासच्या भागात अडकलेले बिबटे मोठ्या संख्येने जखमी झाले होते. हे गंभीर जखमी झालेले बिबटे आणि काही वृद्ध बिबटे कैदेत आहेत. नुकतीच नागपूर बचाव केंद्रातून वाघ आणि बिबट्याचे बछडे आणले गेले.

    Wildlife adoption Program is started Again by Sanjay Gandhi National Park of Mumbai

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??