विशेष प्रतिनिधी
पुणे : पानशेत धरणाच्या महाप्रलयाला ६० वर्षे पूर्ण झाली. १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटले होते. अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते.When the Panshet dam burst; Cataclysm completes 60 years
पाण्यानं पुण्याला नेलं होतं वाहून! पुरातून बाहेर आलेले प्राध्यापक प्र. के। घाणेकर यांनी हा थरार सांगितला. जलप्रलय, अग्निप्रलय, भूकंप किंवा महायुद्ध यांची वर्णने जरी ऐकली किंवा वाचली तरी अंगावर काटा उभा राहतो. त्यापैकी एक असलेले पानशेत धरण फ़ुटल्याची. मग ज्यांनी अशा संकटाला तोंड दिले असेल त्यांची मनस्थिती काय असेल?
- पुणे शहर १२ जुलै १९६१ रोजी प्रलयात सापडले
- पानशेत फुटल्यावर पुण्यात हाहाकार उडाला
- पुराची आठवण आल्यावर अंगावर शहारे येतात
- सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास धरण फुटले
- खरं तर धरण सकाळी सात वाजताच फुटलं होत
- पण पुण्यात बातमी पोचायला उशीर झाला होता
- नदीकाठच्या लोकांना दुसरीकडे जायला सांगितले
- पाणी वेगानं लकडी पूलावरून वाहू लागलं
- हा हा म्हणता म्हणता नारायण पेठेपर्यंत आले होते
- जनसमुदाय घराबाहेर जा असं सांगत होता
- मी त्यावेळी आठवीत होतो.
- शाळेत असतानाच पूर आल्याचे सांगण्यात आले
- आणि शाळा सोडून देण्यात आली
- पुण्यात चार दिवस पाणी आणि वीज पुरवठा नव्हता
- माती गणपतीजवळ असलेल्या घरात गुडघाभर पाणी
- चुलत्यांनी मला पाहिल्यानंतर मावशीकडे पाठविले
- दुसऱ्या दिवशी मावशीने सर्वांना पर्वतीवर पाठवले
- पर्वतीवर जेवढी माणसे पुन्हा कधी पाहिली नाहीत
- कात्रज हौदातील पाण्यावर चार दिवस जगले होते