राज्य शासनाच्या गाढवपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. त्यामध्ये अशोक चव्हाण यांचा हात आहे. याविरोधात येत्या ५ जूनपासून मोर्चे काढण्यात येणार आहे. यावेळीचे मोर्चे हे मुकमोर्चा नसून बोलके असणा आहेत, असे शिवसंग्रमा पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितले. Vinayak Mete alleges cancellation of Maratha reservation due to state government
प्रतिनिधी
पुणे : राज्य शासनाच्या गाढवपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. त्यामध्ये अशोक चव्हाण यांचा हात आहे. याविरोधात येत्या ५ जूनपासून मोर्चे काढण्यात येणार आहे. यावेळीचे मोर्चे हे मुकमोर्चा नसून बोलके असणा आहेत, असे शिवसंग्रमा पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मेटे म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण रद्द होण्यामागे राज्य सरकारचा गाढवपणाच कारणीभूत आहे. प्रामुख्याने आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे आरक्षण रद्द झाले आहे. या विरोधात मराठा समाजात संताप आहे. हा संताप मूक मोर्चांद्वारे बाहेर निघणार आहे. हा मोर्चा कोणत्याही एका संघटनेचा नसून संपूर्ण समाजाचा असणार आहे.
मेटे म्हणाले, कॉँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना ओबीसींचा नेता होण्याची घाई झाली आहे. त्यामुळे ते आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्ये करत आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींचा होता होणार ते ठरवायचे आहे, असा टोलाही त्यांनी मारला. छत्रपती संभाजीराजे यांचे सध्या काम चांगले आहे. त्यांनी वेगळी काही भूमिका घेतल्यावर मग बोलू, असेही मेटे म्हणाले.
सारथी संस्थेत गेल्या एक-दीड वर्षांपासून २४१ विद्यार्थ्यांना पीएच.डी साठीचे अनुदान मिळाले नाही, त्यामुळे आजच्या बैठकीत ते देण्यासाठी चर्चा झाली असे सांगून मेटे म्हणाले, येत्या १ जूनला सारथी संचालकांच्या बैठकीत विद्यार्थ्यांचे गुणांकन तपासून फेलोशिप मानधन देण्यात येणार आहे. तसेच दोन वर्षांत पीएच. डी पूर्ण करण्याबाबत विद्यार्थ्यांना बंधनकारक करणार आहे. सारथी संस्थेत सध्या ४-५ कर्मचारी आहेत, पुढील दोन महिन्यांत ते वाढवून ४० अधिकारी आणि कर्मचारी भरणार आहेत. सारथीला स्वत:ची जागा मिळावी म्हणून अजित पवार यांनी प्रयत्न केले आहेत. लवकरच या जागेचे प्लॅन तयार करणार आहोत.
Vinayak Mete alleges cancellation of Maratha reservation due to state government
महत्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथांचा कठोर निर्णय, रेमडेसिीवीरचा काळबाजार करणाऱ्यांवर उत्तर प्रदेशात रासुकाखाली कारवाई, संपत्तीही जप्त होणार
- पाकिस्तान्याशी मोबाईलवरून बोलताना गुप्तचर विभागाने पकडले, हेरगिरी करणाऱ्या शिक्षिका बहिणींना अटक
- डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर योगगुरू रामदेवबाबांकडून वादग्रस्त विधान मागे
- पुण्यात पहिल्या लाटेतच ६९ टक्के नागरिकांना कोरोना, सिरो सर्व्हेमध्ये झाले उघड
- टाटा स्टिल कंपनीचा निर्णय : कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वयाच्या साठ वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण वेतन, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च