अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अवघी ४ कोटी रूपयांची भरपाई म्हणजे जखमेवर मीठ : आमदार दिलीप बोरसे
विशेष प्रतिनिधी
नाशिक : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यांच्यामुळे झालेल्या नुकसानीची आणि नुकसान भरपाईची तफावत दोन सरकारमधल्या “शेतकरी प्रेमातील” फरकही स्पष्ट करून सांगत आहे. गेल्या वर्षी २०१९ मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने एकट्या नाशिक जिल्ह्यात 63 कोटी रुपये दिले होते. यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ठाकरे – पवार सरकारने फक्त ४ कोटी रुपये देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ही दारुण वस्तुस्थिती भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे. thackeray pawar govt news
गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नगदी पिकांचे शंभर कोटीहून अधिक रूपयांचे नुकसान झाले असतांना शासनाने अवघी चार कोटी रूपयांची भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राज्य सरकारने खरीपाबरोबरच कांदा रोप,द्राक्ष,डाळींब पिंकाच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईनसाठी भरीव निधी दयावा, अशी मागणी दिलीप बोरसे यांनी केले आहे. thackeray pawar govt news
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, तुटपुंजी मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांची अक्षरशः कुचेष्टा केली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकाबरोबरच हजारो रूपये खर्च करून कांदा बियाणे टाकले, मात्र अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचे रोपे खराब होऊन आर्थिक फटका बसला. द्राक्ष, डाळिंब पिकांचे सलग दुसऱ्या वर्षी अतिपावसामुळे ५० कोटी रूपयेहुन अधिक नुकसान झाले. असे असतांना राज्य सरकारने फक्त चार कोटी रूपये इतकी तुटपूंजी भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
वास्तविक गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन 63 कोटी रूपयाची तात्काळ भरपाई दिली होती. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतांना यंत्रणेला पंचनामे करण्यावर मर्यादा आणल्यामुळेच 90% नुकसानग्रस्त शेतकऱ्याना भरपाईपासून वंचित रहावे लागले आहे.
thackeray pawar govt news
लाखो रूपये खर्च करूनही अतिवृष्टीमुळे द्राक्षांची घड जिरून उत्पादन थेट वीस ते पंचवीस टक्क्यावर आले. त्यामुळे उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी कर्जबाजारी आहे. डाळिंब पिकाची देखील तीच अवस्था असून काढणीवर आलेले पीक बुरशीचया प्रादुर्भावामुळे रात्रीतून गळून पडले.
खरिपाची तर नासाडी झालीच. पण घरात थोडीफार जमा असलेली रककम मोडून कांदा बियामे घेतले. मात्र तेही अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारने याचा विचार करून सरसकट भरपाई द्यावी, जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, अशी मागणी बोरसे यांनी केली आहे.