प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी ईद 3 मे रोजी पर्यंतची मुदत ठाकरे – पवार सरकारला दिली होती. परंतु त्या मुदतीची वाट न बघता सरकारने भोंगे काढणार नाही, अशी भूमिका घेऊन राज ठाकरेंचे आव्हान धुडकावले आहे.Thackeray – Pawar government has a rift with Raj Thackeray
ठाकरे – पवार सरकार मधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत आज सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकार सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन चालणारे आहे. परवानगी देऊन लावलेले भोंगे काढायचे कोणतेही आदेश कोर्टाने दिलेले नाहीत. त्यामुळे मंदिरे मशिदींवरचे भोंगे काढणार नाही. त्याचबरोबर कोर्टाने रात्री 10.00 ते सकाळी 5.00 विशिष्ट डेसिबल ठरवून दिलेले आहेत, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आणि ठाण्यातल्या उत्तर सभेत मशिदींवरचे भोंगे काढावेत अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा ठाकरे – पवार सरकारला दिला होता. यासाठी त्यांनी ईद 3 मे पर्यंतची मुदत दिली होती. परंतु ठाकरे – पवार सरकारने त्या मुदतीची वाट न पाहता राज ठाकरे यांचा इशारा धुडकावला आहे. त्यामुळे ठाकरे – पवार सरकार हे राज ठाकरे यांच्याशी राजकीय पंगा तयार झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Thackeray – Pawar government has a rift with Raj Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी; एका व्यक्तीला अटक, व्हिडिओ आला समोर
- देशाला मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येचा नाही तर कट्टरपंथी विचारांचा अधिक धोका ;गिरिराज सिंह
- युक्रेनियन निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी स्थापित परिषदेच्या सह-अध्यक्षपदी सुदंर पिचाई यांची निवड
- उत्तर प्रदेशातील चार शाळांमध्ये २३ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा; नोएडा येथे कोरोना संक्रमण