विशेष प्रतिनिधी
कोलकता– पश्चि म बंगालमध्ये आता पराभवामुळे भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, शिव प्रकाश, अरविंद मेनन आणि प्रभारी कैलास विजयवर्गीय यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत. Tathagat roy target bjp leadership
१३० कोटी लोकसंख्येच्या देशात केंद्रीय नेतृत्व जो आदेश देतो, त्याचे पालन राज्यातील नेतेच करतात, पण येथे असे झाले नाही. बंगालमधील भाजपचे जे नेते आहेत, त्यांना काहीही माहीत नाही, अशी टीका करीत रॉय यांनी म्हटले आहे की राज्यात भाजप मागे पडण्याचे एक कारण कारण म्हणजे भाजपच्या छताखाली आलेला तृणमूलमधील कचरा हे आहे.
भाजपचे कार्यकर्ते १९८०पासून पक्षासाठी सातत्याने काम करीत होते, त्यांना तृणमूल काँग्रेसचा त्रास सहन करावा लागत आहे. पण भाजपचे ‘कैलास-दिलीप-शिव- अरविंद’ (केडीएसए) त्यांच्या बचावासाठी पुढे आले नाहीत, त्यांना काम करण्यास उभारीही दिली नाही. उलट ‘तृणमूल’मधून आलेल्या कचऱ्याला निवडणुकीचे तिकीट देण्यात आणि त्यांना सप्ततारांकित हॉटेलमध्ये आराम करता यावा, यासाठी ते झटत होते. आता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अत्याचार, छळाला सामोरे जावे लागत आहे, असे रॉय यांनी सांगितले.
Tathagat roy target bjp leadership
महत्त्वाच्या बातम्या
- बड्या वृत्तसमुहांकडून फेक न्यूजद्वारे योगी आदित्यनाथांची बदनामी, म्हणे गोशाळांमध्ये गाईंची कोरोना तपासणी करण्याचे काढले आदेश
- पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात
- राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण नाहीच, राज्यभर मराठा मोर्चे काढण्याचा विनायक मेटे यांचा इशारा
- Daya Nayak Transferred : प्रदीप शर्मांच्या एन्काउंटर स्कॉड मधील एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक साईडलाईन,थेट गोंदियात बदली
- मराठा आरक्षणप्रश्नी महाराष्ट्राचे खासदार घेऊन मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपतींना भेटणार ; भाजप खासदार संजयकाका पाटील यांचा निर्धार