विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या संपाच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी संसार मांडला आहे. ST staff worker agitation at aurangabad
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तेव्हा पर्यंत संप सुरु राहण्याची भूमिका ३७० कर्मचाऱ्यांनी आज घेतली आहे. संप सुरु राहावा आणि स्वतः दहा दहा रुपये गोळा करून जेवणाचा प्रश्न सोडविला आहे. संप करणाऱ्या कुटुंबातील व महिला कर्मचाऱ्यांनी संपाच्या ठिकाणीच स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आहे,
– एसटी कर्मचाऱ्यांनी मांडला स्थानक परिसरात संसार
– भोजन व्यवस्थेसाठी स्वयंपाक सुरु
– प्रत्येकी दहा रुपये गोळा करून अव्याहत संप
-कुटुंबातील व महिला कर्मचाऱ्यांकडून स्वयंपाक