विशेष प्रतिनिधी
येवला : गंगापुर तालुक्यातील सावखेडा या ग्रामीण भागातील शिवसैनिक राजुशेठ जैस्वाल यांनी सावखेडा गंगापूर ते मुंबई मातोश्री असा 400 किलोमीटर पायी प्रवास सुरू केला असून पायी प्रवास करून हा शिवसैनिक मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून मुख्यमंत्र्यांकडे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या प्रश्न मांडणार आहे. Solve our questions too; Shiv Sainik Rajusheth Jaiswal urges to chief minister Uddav thakary
त्याचप्रमाणे शिवसेनेत जी गटबाजी चालू आहे ती थांबवावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, सामान्य शिवसैनिकांना त्याच्या प्रॉपर्टी वर कर्ज उपलब्ध करून द्यावे असे विविध प्रश्न घेवून हा शिवसैनिक मुंबई पायी प्रवासाला निघाला आहे . आज या शिवसैनिकांचे येवला नगरीत आगमन झाले असता शहरवासीयांनी तसेच शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.
- आमचेही प्रश्न सोडवा; शिवसैनिकाचा टाहो
- राजुशेठ जैस्वाल यांची आग्रही मागणी
- शिवसैनिकांचे प्रश्न मांडण्याकरता पायी प्रवास
- सावखेडा गंगापूर ते मुंबई मातोश्री असा प्रवास
- शिवसेनेतील गटबाजी तातडीने थांबवावी
- शेतीमालाला हमीभाव मिळावा
- शिवसैनिकांना प्रॉपर्टीवर कर्ज मिळावे
Solve our questions too; Shiv Sainik Rajusheth Jaiswal urges to chief minister Uddav thakary