विशेष प्रतिनिधी
मुंबई: दोन केंद्रीय मंत्री आलेले; पण लाल दिव्यांच्या गाड्या नाहीत की सुरक्षेचा बडेजाव नाही. अगदी सर्वसामान्यांप्रमाणे हॉटेलमध्ये येऊन महिला व बालविकास मंत्री स्मृति इराणी आणि केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या मुंबई भेटीत माटुंगा येथील एका भोजनालयात मसाला डोसा आणि वडापाववर यथेच्छ ताव मारला. Smriti Irani and Mukhtar Abbas Naqvi tested Vadapav while sitting as usual.
भोजनालयाच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, आमच्या भोजनालयात केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास आणि स्मृती इराणी आल्या. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच ते भोजनालयात बसून खात होते. आपल्या बाजूला बसून दोन केंद्रीय मंत्री आवडत्या पदार्थांवर ताव मारत असल्याचे पाहून भोजनालयात आलेल्या सर्वसामान्य लोकांना आश्चयार्चा धक्काच बसला. येथे त्यांना कोणत्याही प्रकारची व्हीआयपी ट्रिटमेंट मिळालेली नाही.
पोषण जागरुकता अभियान या कार्यक्रमासाठी नक्वी आणि इराणी मुंबईत आले आहेत. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या संयुक्त सहभागातून हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी धारावीत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा केली, तसेच त्यांच्या घरी देखील भेट दिली.
इराणी यांनी आयसीडीएस येथे डिजिटल गुड्डी गुड्डा बोर्डचे उद्घाटन देखील केले. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत जन्मदराची माहिती अद्ययावत करणे, देखरेख करणे आणि ती माहिती दाखवण्यासाठी या बोर्डचा वापर होतो. बोर्डावर अभियानाबाबतची माहिती आणि शैक्षणिक साहित्याबाबत माहितीही दिली जाते. याचा उपयोग अभियानाचा प्रचार करणे आणि उपयुक्त माहिती देत राहणे यासाठी देखील बोर्डाचा वापर केला जातो, अशी माहिती अभियात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली.
Smriti Irani and Mukhtar Abbas Naqvi tested Vadapav while sitting as usual.
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कार’ जाहीर ; पुण्यात गुरुवारी वितरण
- लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुख यांचा वकील आणि सीबीआय सब इन्स्पेक्टरला दोन दिवस न्यायालयीन कोठडी
- Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयाने सिंघू बॉर्डर रिकामी करण्याची याचिका नाकारली, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश
- भवानीपूर सोडून नंदिग्रामला येऊन पराभूत व्हायला काय आम्ही निमंत्रण दिले होते??; सुवेंदू अधिकारी यांचा ममतांना टोला