Share Market : शेअर बाजारातील विक्रमी तेजीमुळे भारतीय शेअर बाजाराचा समावेश जगातील पहिल्या 5 देशांच्या यादीत झाला आहे. एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार मूल्यांकनावर आधारित भारत जगातील 5 वा सर्वात मोठा बाजार बनला आहे. गुरुवारी झालेल्या विक्रमी तेजीनंतर बीएसईमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 260 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. share market market cap of listed companies on bse crossed usd 3 point 54 trillion mark
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शेअर बाजारातील विक्रमी तेजीमुळे भारतीय शेअर बाजाराचा समावेश जगातील पहिल्या 5 देशांच्या यादीत झाला आहे. एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांच्या एकूण बाजार मूल्यांकनावर आधारित भारत जगातील 5 वा सर्वात मोठा बाजार बनला आहे. गुरुवारी झालेल्या विक्रमी तेजीनंतर बीएसईमध्ये सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 260 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
बाजारमूल्य 3.4 ट्रिलियन डॉलरच्या पुढे
बीएसईचे सीईओ आशिष चौहान यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 260.78 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 73.5 रुपये प्रति डॉलरच्या विनिमय दराने, भारताचे मार्केट कॅप आज 16 सप्टेंबर 2021 रोजी 3.54 ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर पोहोचले. त्यांनी अंदाज लावला की, कदाचित भारत बाजार मूल्यानुसार जगातील 5 वा सर्वात मोठा देश बनला आहे.
एक दिवसापूर्वी फ्रान्सला मागे टाकले
बाजारातील तेजीच्या मदतीने एक दिवस आधी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी भारताने फ्रान्सला मागे टाकत सहावे स्थान मिळवले होते. 15 सप्टेंबरपर्यंत फ्रेंच बाजाराचे मार्केट कॅप 3.402 लाख कोटी डॉलर होते. 15 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी भारताच्या शेअर बाजाराचे बाजारमूल्य 3.405 लाख कोटी डॉलरवर पोहोचले. सध्या बाजारमूल्याच्या आधारावर अमेरिका आघाडीवर आहे. 15 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत सूचीबद्ध कंपन्यांची एकूण बाजारपेठ 51.3 लाख कोटी डॉलर आहे, तर चीनमधील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 12.42 लाख कोटी डॉलर आणि यूकेमधील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 3.68 लाख कोटी डॉलर आहे.
share market market cap of listed companies on bse crossed usd 3 point 54 trillion mark
महत्त्वाच्या बातम्या
- Aukus : अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाची नवीन ‘सुरक्षा युती’ची घोषणा, फ्रान्सला धक्का, तर चीनची तिन्ही देशांवर आगपाखड
- चीनमध्ये 6.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप, अनेक घरे कोसळली, 3 जणांचा मृत्यू, 60 जण जखमी
- Virat Kohli : कर्णधारपदी असताना देशात एकही टी-20 सिरीज गमावली नाही, असा होता विराट कोहलीचा टी-२० प्रवास
- Virat Kohli : विराट कोहलीनंतर आता कोण होऊ शकतो टी-20 संघाचा कर्णधार, ‘या’ दोन खेळाडूंची नावे आघाडीवर
- ORGAN DONATION PUNE : पुण्यातील श्रुति नरे…फक्त १७ वर्ष जगली ; पण ६ जणांना जीवदान देऊन गेली…