• Download App
    साक्षी महाराज यांनी मोदींच्या निर्णय़ाचे केले कौतुक ; म्हणाले - मोदींचे मन मोठंSakshi Maharaj appreciates Modi's decision; Said - Modi's mind is big

    साक्षी महाराज यांनी मोदींच्या निर्णय़ाचे केले कौतुक ; म्हणाले – मोदींचे मन मोठं

    कृषी कायदे मागे घेऊन मोदींनी पाकिस्तान, खलिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांवर मोठा प्रहार केला असल्याचं खासदार साक्षी महाराज म्हणाले.Sakshi Maharaj appreciates Modi’s decision; Said – Modi’s mind is big


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कृषी कायदे रद्द केले आहेत.दिल्लीच्या सीमेवर वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आल्याची भावना काहीजण व्यक्त करत आहेत. कृषी कायदे मागे घेऊन मोदींनी पाकिस्तान, खलिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांवर मोठा प्रहार केला असल्याचं खासदार साक्षी महाराज म्हणाले.



    यावेळी ते म्हणाले की, बिल तयार होतील, त्यात सुधारणा होतील आणि पुन्हा येतील. कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान जिंदाबाद, खलिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.मोदींचे मन मोठं आहे. त्यांनी देश आणि बिल यापैकी देशाची निवड केली अशा शब्दात साक्षी महाराज यांनी मोदींच्या निर्णय़ाचे कौतुक केले आहे.

    साक्षी महाराज म्हणाले की, २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील. बिल तयार होतात, बिघडतात, पुन्हा बिल आणण्यासाठी वेळ लागत नाही. तसंच या कायदे मागे घेण्यानं निवडणुकीवर परिणाम होणार नाही.

    Sakshi Maharaj appreciates Modi’s decision; Said – Modi’s mind is big

     

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते