• Download App
    डॉक्टरांचे हात पाय बांधून लोणावळ्यात ७० लाखांचा दरोडा, शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी अर्धा तास ठेवले ओलिस Robbery of Rs 70 lakh in Lonavla with doctor's hands and feet tied%

    डॉक्टरांचे हात पाय बांधून लोणावळ्यात ७० लाखांचा दरोडा, शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी अर्धा तास ठेवले ओलिस

    डॉक्टर पती-पत्नीचे हातपाय बांधून सुमारे ७० लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. लोणावळ्यातील उच्चभ्रु अशा प्रधान पार्कमध्ये शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी डॉक्टर पती-पत्नीला अर्धा तास ओलिस ठेवले होते.  Robbery of Rs 70 lakh in Lonavla with doctor’s hands and feet tied


    प्रतिनिधी

    पुणे : डॉक्टर पती-पत्नीचे हातपाय बांधून सुमारे ७० लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेला. लोणावळ्यातील उच्चभ्रु अशा प्रधान पार्कमध्ये शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी डॉक्टर पती-पत्नीला अर्धा तास ओलिस ठेवले होते.

    लोणावळा परिसरातील प्रधान पार्क भागात डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल राहतात. दरोडेखोरांनी खंडेलवाल दाम्पत्याच्या घरात प्रवेश करुन त्यांचे हात-पाय बांधले आणि सशस्त्र दरोडा टाकला.

    पहाटेच्या सुमारास डॉ खंडेलवाल यांच्या पहिल्या मजल्यावरील घराची खिडकी उघडून सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्रासह आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर डॉ खंडेलवाल आणि त्यांची पत्नी विजया खंडेलवाल यांना शस्त्रांचा धाक दाखवत त्यांचे हात-पाय दोरीने बांधले. घरातील सर्व रोख रक्कम आणि सोने असा ऐवज त्यांनी लुटून नेला. सुमारे अर्धा तास दरोडेखोर त्यांच्या घरात होते.

    50 लाख रुपये रोख आणि 16 लाख 77 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने असा एकूण 66 लाख 77 हजाराचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर हे सहा दरोडेखोर गच्चीवरुन चादर बांधत उतरुन पसार झाले. दरोडेखोर हे रस्सीने खाली येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

    Robbery of Rs 70 lakh in Lonavla with doctor’s hands and feet tied

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरते तसे दाखविले??