Renewable Energy : रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रात देशाने गुरुवारी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अक्षय ऊर्जेची स्थापित निर्मिती क्षमतेने एक लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. यासह भारत अक्षय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. 2022 पर्यंत देशाने 1,75,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. Renewable Energy Installed Capacity In The Country Crosses One Lakh Mw
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रिन्युएबल एनर्जीच्या क्षेत्रात देशाने गुरुवारी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. अक्षय ऊर्जेची स्थापित निर्मिती क्षमतेने एक लाख मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. यासह भारत अक्षय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एका अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली. 2022 पर्यंत देशाने 1,75,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, “प्रमुख जलविद्युत प्रकल्प वगळता देशातील एकूण स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता एक लाख मेगावॅट झाली आहे. रिन्युएबल एनर्जीच्या स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारत आज जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सौर ऊर्जेमध्ये स्थापित क्षमतेच्या बाबतीत भारताचा जगात पाचवा आणि पवन ऊर्जेच्या बाबतीत चौथा क्रमांक आहे.
ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी ट्विटरवर लिहिले, “देशातील वीज क्षेत्रातील आणखी एक ऐतिहासिक दिवस. आमची स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता (मोठे जलविद्युत प्रकल्प वगळता) एक लाख मेगावॅट ओलांडली आहे…”
निवेदनात म्हटले आहे की, देशात अक्षय ऊर्जेची एकूण स्थापित क्षमता एक लाख मेगावॅटपर्यंत पोहोचली असताना, 50,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प निर्माणाधीन आहेत. तर 27,0000 मेगावॅट निविदा प्रक्रियेत आहे. मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचा समावेश केल्यास स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता 1,46,000 मेगावॅटपर्यंत वाढेल.
देशाने 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षेत्रात 4,50,000 मेगावॅट क्षमतेची स्थापना करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Renewable Energy Installed Capacity In The Country Crosses One Lakh Mw
महत्त्वाच्या बातम्या
- सत्ता बदलताच नेपाळचा सूरही बदलला, नेपाळने म्हटले, चीन कधीही भारताची जागा घेऊ शकणार नाही
- वीर जवान तुझे सलाम : कॅप्टन आशुतोष आणि मेजर अरुण कुमार पांडे यांना शौर्य चक्र, काश्मीरमध्ये कट्टर दहशतवाद्यांचा केला होता खात्मा
- जम्मू -काश्मिरात यावर्षी खास असणार स्वातंत्र्यदिन, तब्बल 23,000 सरकारी शाळांवर तिरंगा फडकणार
- UP Election : मुख्यमंत्री योगींविरोधात निवडणूक लढणार माजी IPS अमिताभ ठाकूर , म्हणाले- ही तत्त्वांची लढाई !
- तालिबानची कोरोना लसीवर बंदी, अफगाणचा 65 टक्के भूभाग व्यापला, राजधानी काबूलवरही लवकरच कब्जा करण्याची तयारी