विशेष प्रतिनिधी
मुंबई – ‘गुलाब’ चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीकडे सरकत असून सोमवारी मध्यरात्री ते ओडिशा व आंधप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार असून काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.Red Alert in Thane, Palghar, Raigadh
‘गुलाब’ चक्रीवादळामुळे मंगळवारी (ता.२८) पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे; तर मुंबई, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी (ता. २७) मराठवाडा आणि विदर्भात, मंगळवारी (ता. २८) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या दरम्यान वाऱ्यांचा वेग अधिक राहणार असल्याचा इशारादेखील हवामान विभागाने दिला आहे.
Red Alert in Thane, Palghar, Raigadh
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारत बंद’ सुरू असताना दिल्ली-सिंघू सीमेवर एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू, दिल्ली-गाझीपूर सीमा 10 तासांनी खुली
- पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा पुतळा बॉम्बने उडवला, ग्वादरमध्ये बलुच बंडखोरांचे कृत्य
- ‘भारत बंदची हाक देणाऱ्या संघटना तालिबानी’, बीकेयू – भानुच्या अध्यक्षांचे वक्तव्य, राकेश टिकैतांवरही डागली तोफ
- पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन लाँच : काय आहे हेल्थ कार्ड? ते कसे तयार होणार?, त्याचा फायदा काय? वाचा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…
- सीमेवर चीन पुन्हा सक्रिय : लडाख सीमेवर तंबू ठोकले; आठ ठिकाणी लष्करी छावण्या, प्रत्येक ठिकाणी ८४ तंबू