वृत्तसंस्था
अमृतसर : दिल्लीच्या वेशीवर श्रीमंत पंजाबी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वेच्या माल वाहतूकीवर प्रतिकूल परिणाम झाला असून गेल्या महिनाभरात उत्तर रेल्वेला साधारणपणे २४०० कोटी रूपयांचा फटका बसल्याचा अंदाज आहे. farmers’ agitation: Ashutosh Gangal, GM, Northern Railway
उत्तर रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर आशुतोष गांगल यांनी ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. आम्ही रेल्वेची माल वाहतूक सुरळित ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. नोव्हेंबर महिन्यात माल वाहतूकीत फारसा अडथळा आला नाही. पण आंदोलनामुळे गाड्या स्थानकांवर पोहोचायला आणि माल उतरायला नियोजित वेळेपेक्षा खूपच वेळ लागत होता.
farmers’ agitation: Ashutosh Gangal, GM, Northern Railway
आता शेतकरी आंदोलनामुळे बियास ते अमृतसर अंतरातील एक मार्ग पूर्णपणे बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे माल वाहतूकीवर प्रतिकूल परिणाम होतो आहे. त्यामुळे रेल्वेच्या नुकसानी बरोबर मालाचेही नुकसान होतेय. या शेतकरी आंदोलनामुळे अंदाजे २४०० कोटी रूपयांचे नुकसान उत्तर रेल्वेला सहन करावे लागले आहे, असे गांगल यांनी स्पष्ट केले.
One section is blocked from Beas to Amritsar. Freight carriage hasn’t been affected much since November but time to reach destination is a lot more. We estimate that Rs 2,400 crore loss has been faced by railways due to farmers’ agitation: Ashutosh Gangal, GM, Northern Railway pic.twitter.com/JnIPK74hrJ
— ANI (@ANI) December 25, 2020