• Download App
    योगींचे लोकसंख्या नियंत्रण धोरण नबाब मलिकांना टोचले; संघातल्या बिनलग्नाच्या लोकांसाठी पॉलिसी बनवा, म्हणाले...!! population control; NCP leader nawab malik makes controversial statement on RSS pracharks

    योगींचे लोकसंख्या नियंत्रण धोरण नबाब मलिकांना टोचले; संघातल्या बिनलग्नाच्या लोकांसाठी पॉलिसी बनवा, म्हणाले…!!

    प्रतिनिधी

    मुंबई – आसाम आणि उत्तर प्रदेशात तिथल्या सरकारांनी लोकसंख्या नियंत्रण धोरण आखले आहे. त्याला देशभरातून बिहार, कर्नाटक यांच्यासारख्या काही राज्यांमध्ये सकारात्मक प्रतिसादही मिळतो आहे. पण नेमके हेच धोरण राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातले अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिकांना टोचले आहे. population control; NCP leader nawab malik makes controversial statement on RSS pracharks

    त्यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. ते म्हणाले की दोन अपत्ये ही पॉलिसी 21 वर्षांपूर्वीपासून महाराष्ट्रात आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता हा दिंडोरा पिटत आहेत. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असलेल्या अनेकांनी लग्न केलेले नाही, त्यांना मुले नाहीत. त्यांच्यासाठी एक पॉलिसी बनवा. साक्षी महाराज म्हणतात खूप मूल जन्माला घाला, मग त्यांना कुठली पॉलिसी लावणार?, असे वादग्रस्त वक्तव्यही नवाब मलिक यांनी केले.



    यावर अजून संघ किंवा अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि आसामच्या लोकसंख्या धोरणाला पाठिंबा व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की आपल्याला चीनसारखे कठोर निर्बंध लावता येणार नाहीत. पण ठामपणे लोकसंख्या नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी आपण नक्कीच करू शकतो.

    फडणवीस म्हणाले, की लोकसंख्या नियंत्रण कायदा संपूर्ण देशासाठी तयार करण्यात यावा. आपल्याला अगदी चीनप्रमाणे निर्बंध घालायचे नाहीत. पण लोकसंख्या नियंत्रणात ठेवली पाहिजे. आपण लोकशाही देशामध्ये राहतो. आपण वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हा कायदा लागू केल्यास नक्कीच लोकसंख्येवर नियंत्रण मिळवू शकतो,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    population control; NCP leader nawab malik makes controversial statement on RSS pracharks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackrey brothers तारीख बदलून मोर्चा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!

    Malegaon sugar factory election बारामती नाही उरली एकतर्फी, हा खरा माळेगावच्या निवडणुकीचा संदेश!!