• Download App
    वीज कनेक्शनसाठी विलंब झाल्यास ग्राहकास भरपाई | The Focus India

    वीज कनेक्शनसाठी विलंब झाल्यास ग्राहकास भरपाई

    • केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी 

    नऊ दिल्ली : वीज कानेक्शचा अर्ज करूनही निर्धारित वेळेत ते दिले नाही तर ग्राहकांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. भरपाईची रक्कम ग्राहकाच्या खात्यात वर्ग केली जाईल, असे केंद्रीय ऊर्जामंत्री राजकुमार सिंग यांनी ट्विट करून स्पष्ट केले. Penalty amount to be credited in consumer account

    वीज ग्राहकांच्या हक्कांच्या नियामाबाबत त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. प्रथमच ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन हा निर्णय घेतला आहे, असे सांगताना सिंग म्हणाले, ग्राहकांना सेवा देण्यासाठीच विद्युत यंत्रणा अस्तित्त्वात असल्याचे या नियमातून दिसते.

    नवीन विज कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज करण्याच्या तारखेपासून, मेट्रो शहरांमध्ये जास्तीत जास्त 7 दिवस, इतर शहरांमध्ये 15 दिवस आणि ग्रामीण भागात 30 दिवसांची कमाल मुदत देण्यात येत आहे. या मुदतीत कनेक्शन दिले नाही तर ग्राहकाला आता भरपाई मिळणार आहे.

    पहिल्यांदाच सरकारने हे म्हटले आहे की, ग्राहकांना हक्क असतात. त्या अधिकारांचा वापर करता येतो आणि त्यांचे उल्लंघन केल्यास ही भरपाई केली जाऊ शकते.

    Penalty amount to be credited in consumer account

    आम्ही नवीन नियमांद्वारे सर्वसामान्यांना सामर्थ्यवान बनवित आहोत. सेवा पुरवठादारांना दंड केल्याशिवाय ते वठणीवर नाहीत. ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांवर हा प्रभावी उपाय असेल.

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!

    वंदे मातरमच्या मुद्द्यावरून एकट्या नेहरूंचीच का बदनामी करता??; पण मल्लिकार्जुन खर्गेंनी‌ राज्यसभेत सवाल करून नेमके केले काय??