• Download App
    राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर | The Focus India

    राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर

    राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आंदोलन केल्यावर या पदाधिकारी महिलेने माफी मागितली.

    विशेष प्रतिनिधी

    अंबरनाथ : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आंदोलन केल्यावर या पदाधिकारी महिलेने माफी मागितली. Offensive text on Prakash Ambedkar by a woman NCP Students Congress

    राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव स्नेहल कांबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये स्नेहल कांबळे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अंबरनाथमधील वंचित आघाडीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी त्या आक्षेपार्ह पोस्टवर प्रतिक्रिया देखील दिल्या. त्यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

    यानंतर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या स्नेहल कांबळे यांनी सोशल मीडियावर दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत पोलिसांना निवेदन दिले.

    Offensive text on Prakash Ambedkar by a woman NCP Students Congress

    याप्रकरणी सखोल चौकशी करून चार ते पाच दिवसात याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

    Related posts

    अजूनही “टाळी”, “पावले”, “फोन कॉल” पर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!

    गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाची पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची भाषा!!

    Congress : काँग्रेसच्या कर्मावर आणि भाजपच्या वर्मावर बोट ठेवत तिसऱ्या आघाडीला तोंड फुटले!!