वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी जलाभिषेक करण्यासाठी जगातील ११५ देशातून पाणी आणले आहे. ही बाब भारतासाठी गौरवास्पद आहे, अशी माहिती खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. It is glorious to bring water from 115 countries for construction of Ram temple: Rajnath Singh ; Message of Vasudhaiva Kutumbakam
नुकत्याच एका गैर सरकारी संस्थेने राम मंदिर निर्माण करण्यासाठी ११५ देशातून पाणी जलाभिषेक करण्यासाठी आणल्याचा दावा केला होता. त्यावर सिंह यांनी शनिवरी याबाबतची माहिती दिली. तसेच राम ललाच्या जलाभिषेकासाठी सर्व देशातून पाणी आणलेच पाहिजे. भारतीय ऋषिनी विश्वालाच कुटुंब मानले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ चा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यामुळेच राम मंदिर निर्माण व जलाभिषेक करण्यासाठी सर्व देशांतून पाणी आणले पाहिजे. हे पाणी स्वीकारल्यानंतर त्यांनी ही माहिती स्वतःच उघड केली आहे.
या पूर्वी अन्य देशातून पाणी आणल्याचे वृत्त माध्यमात प्रसारित झाले होते. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, अफगाणिस्तान, कॅनडा, कंबोडिया, जर्मनी, इटलीसह अन्य देशांचा समावेश होता. हा भारताचा गौरव असल्याचे ते म्हणाले.
भारताला जाती-धर्मावर तोडता येणार नाही, असे सांगताना ते म्हणाले, हिंसेचे समर्थन भारताने केले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराचे काम सुरु झाले. ही सकारात्मक सुरुवात आहे.
It is glorious to bring water from 115 countries for construction of Ram temple: Rajnath Singh ; Message of Vasudhaiva Kutumbakam
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबमध्ये काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? विधिमंडळ गटाचा नेता सोनिया गांधी निवडणार, सिद्धूंशिवाय हे 4 नेतेही शर्यतीत
- Punjab CM Captain Amarinder Singh Resign : पंजाबात कॅप्टन अमरिंदर यांची विकेट, राजीनाम्यानंतर म्हणाले, “खूप अपमानित वाटले, हायकमांडला ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना सीएम करावे!”
- खुशखबर : खाद्य तेलांच्या किमतीत घसरण, जाणून घ्या कोणते तेल किती झाले स्वस्त?
- फौजदारी खटल्यांची चुकीची माहिती देणे महागात पडणार, सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका, अशा कर्मचाऱ्यांना नियुक्तीचा हक्क नाही
- मोठी बातमी : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासोबतच काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊ शकतात कॅप्टन अमरिंदर; पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप