Tuesday, 6 May 2025
  • Download App
    Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई 12 वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले 100 % गुण । Inspiring Farmer laborers daughter brought full 100% marks in CBSE class 12 results, wants to serve the country by becoming an IAS

    Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई १२ वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले १०० % गुण

    Inspiring Farmer laborers daughter brought full 100% marks in CBSE class 12 results, wants to serve the country by becoming an IAS

    Inspiring : कठोर परिश्रम केले तर यश हे हमखास मिळतच असते. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही मनापासून मेहनत घेतली ना तर यशोशिखरावर जाण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. उत्तर प्रदेशातील बडेरा गावातील एका शेतमजुराची मुलगी अनसूया कुशवाह हिने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 12 वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली. शुक्रवारीच हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. Inspiring Farmer laborers daughter brought full 100% marks in CBSE class 12 results, wants to serve the country by becoming an IAS


    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : कठोर परिश्रम केले तर यश हे हमखास मिळतच असते. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही मनापासून मेहनत घेतली ना तर यशोशिखरावर जाण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. उत्तर प्रदेशातील बडेरा गावातील एका शेतमजुराची मुलगी अनसूया कुशवाह हिने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 12 वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली. शुक्रवारीच हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

    अनसूयाने अडचणींचा बाऊ केला नाही

    अनुसया ही शिव नादर फाउंडेशनद्वारे संचालित ग्रामीण यूपीच्या आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत निवासी शाळेतील विद्यार्थिनी आहे. विद्याज्ञान ही तिची शाळा बुलंदशहरमध्ये आहे.
    17 वर्षांची अनसूया म्हणते, “आमच्या गावातील कोणतीही मुलगी इयत्ता आठवीच्या पुढे शिकत नाही. शाळेनंतर त्यांना लगेचच त्यांना लग्नासाठी तयार केले जाते. मला आधीपासूच शिक्षणाची आवड आहे. कारण मला वाटते की, हे असे काहीतरी आहे जे मला इतरांपासून वेगळे राहण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे मी विद्याज्ञानसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली होती.”

    सात भावंडांपैकी एक असलेली अनसूया 2014 मध्ये शाळेत दाखल झाली, तेव्हा ती 6 वीत होती. ती म्हणते, आमच्या गावातील मुलेही आठवीपर्यंत शिकतात. त्यानंतर ते आपल्या वडिलांना कारखान्यात मदत करण्यासाठी किंवा गावात शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी कामाला आहेत. जेव्हा मला अभ्यासासाठी गाव सोडण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला. तथापि, गावात असे अनेक लोक होते ज्यांनी माझ्या आई -वडिलांना त्यांची मुलगी हातातून जाईल, असे टोमणे मारले. पण माझ्या पालकांनी या टोमण्यांकडे कधीच लक्ष दिले नाही.

    अनसूयाचे आयएएस होण्याचे स्वप्न

    अनसूयाला भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये अधिकारी होण्याची इच्छा आहे. ती म्हणते, “मला माझ्या गावासाठी काम करायचे आहे, मला वाटते की राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत माझा भाग खूप अविकसित आहे. आरोग्य, शिक्षणाचा अभाव आहे आणि येथील माती सुपीकही नाही.”

    अनुसूयाचे वडील गावातील शेतात मजूर म्हणून काम करतात, पण जेव्हा पाऊसकाळ चांगला नसतो तेव्हा त्यांना महोबा जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर मजूर म्हणून काम शोधावे लागते. आर्थिक अडचणी, कुटुंबात व गावात उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही अनसूयाने मिळवलेले हे यश आता गावातील इतरांनाही प्रेरणा देणारे ठरले आहे. मेहनतीला जर योग्य दिशा आणि योग्य संधी मिळाली तर काय होऊ शकते, हे अनसूयाने आपल्या निकालातून दाखवून दिले आहे.

    Inspiring Farmer laborers daughter brought full 100% marks in CBSE class 12 results, wants to serve the country by becoming an IAS

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Multi-Influence Land : नौदलाकडून मल्टीइन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची यशस्वी चाचणी; समुद्रात शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करेल

    India-Pakistan War : महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक सह 16 जिल्ह्यांमध्ये उद्या Mock drill

    महाराष्ट्रातल्या महापालिका + जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; पुढच्या 4 महिन्यांमध्ये निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश!!