वृत्तसंस्था
मुंबई : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकातील सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करा, गावे महाराष्ट्रात सामील करा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे. Injustice on Marathi speaking people in the border areas of Karnatak- Maharashtra ; Deputy Chief Minister Ajit Pawar’s letter to Prime Minister Modi
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह शेकडो मराठी भाषिक गावे कर्नाटकात आहेत.तेथील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून अन्याय होत आहे. कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री अजित पवारांनी व्यक्त केली. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी देखील सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत असून आपण मराठी भाषिक बांधवांची मागणी मान्य करावी, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे पंतप्रधानांना केली.
न्यायासाठी लढा सुरूच राहणार
बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या भूमिकेला पाठिंबा देऊन सीमाभागातील मराठी बांधवांना पंतप्रधानांनी न्याय द्यावा, अशी महाराष्ट्रवासियांची इच्छा असल्याचे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
Injustice on Marathi speaking people in the border areas of Karnatak- Maharashtra ; Deputy Chief Minister Ajit Pawar’s letter to Prime Minister Modi
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोलेंकडून राहुल गांधींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, “राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?”
- संसदेतील विरोधकांच्या गोंधळावर भावुक झाले व्यंकय्या नायडू, म्हणाले- राज्यसभेचे पावित्र्य गेले; गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईची शक्यता
- “दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत” वडेट्टीवारांचा सणसणीत टोला
- आता एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकांनाही होणार दंड, रिझर्व्ह बँकेने दिले हे निर्देश