IND vs NZ : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 62 धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध किवी संघाची ही किमान धावसंख्या आहे. भारताकडून आर. अश्विनने चार विकेट घेतल्या. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला तीन बळी मिळाले. IND vs NZ New Zealand team Made just 62 runs, India got a lead of 263 r ashwin and siraj took wickets
वृत्तसंस्था
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 62 धावांत गारद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध किवी संघाची ही किमान धावसंख्या आहे. भारताकडून आर. अश्विनने चार विकेट घेतल्या. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला तीन बळी मिळाले.
भारताने पहिल्या डावात 325 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या संघाला पहिल्या डावात केवळ 62 धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला 263 धावांची आघाडी मिळाली. मात्र, कर्णधार विराट कोहलीने पाहुण्या संघाला फॉलोऑन न दिल्याने भारत आपला दुसरा डाव खेळत आहे.
कानपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी करणारे न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम आणि विल यंग या दोघांनाही मोहम्मद सिराजने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यंग 04 आणि लॅथम 10 धावा करून बाद झाला. यानंतर सिराजने रॉस टेलरला बाद करून पाहुण्या संघाला तिसरा धक्का दिला. त्याने फक्त एक धाव काढली.
न्यूझीलंडच्या संघाला सुरुवातीच्या या धक्क्यातून सावरता आले नाही आणि ठराविक अंतराने त्यांनी विकेट गमावल्या. न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाने भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आणि त्यांना केवळ 62 धावा करता आल्या.
भारताच्या घातक गोलंदाजीसमोर किवी संघाच्या नऊ फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. केवळ टॉम लॅथम 10 आणि काइल जेमिसन 17 हेच दुहेरी धावसंख्या गाठू शकले. भारताकडून आर. अश्विनने आठ धावांत चार बळी घेतले. त्याचवेळी सिराजने 19 धावांवर तीन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याशिवाय अक्षर पटेलला दोन आणि जयंत यादवला एक यश मिळाले.
IND vs NZ New Zealand team Made just 62 runs, India got a lead of 263 r ashwin and siraj took wickets
महत्त्वाच्या बातम्या
- धक्कादायक : शेतकऱ्याने विकला ११२३ किलो कांदा, हाती आले १३ रुपये, राजू शेट्टी म्हणतात- यातून सरकारचं तेरावं घालायचं का?
- आज मोदी, तर 16 डिसेंबरला राहुल गांधी उत्तराखंडच्या मोहिमेवर; 18 हजार कोटींच्या प्रकल्पांचा मोदींच्या हस्ते शिलान्यास
- कुसुमाग्रजांचे नाव दिले, पण सावरकरांचे नाव न देण्याचा देण्याचा अट्टाहासातून दोन्ही महनीयांची उंची कमी करत नाही का? फडणवीसांचा परखड सवाल
- IND V/s NZ : एजाज पटेलने पटकावल्या सर्व १० विकेट, कुंबळेची केली बरोबरी, भारताच्या सिराजनेही किवी सलामीविरांना धाडले माघारी
- मोठी बातमी : परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात आता इंधन म्हणून बांबूचाही वापर होणार, महानिर्मितीने काढली निविदा, पाशा पटेल यांच्या पाठपुराव्याला यश