• Download App
    HIJAB CONTROVERSY TRUTH : वर्गात हिजाब घालू नये हा नियम 32 वर्ष जुना ! कर्नाटकातील त्याच विद्यालयातील प्राचार्यांचा मोठा खुलासा .HIJAB CONTROVERSY TRUTH: This rule of not wearing hijab in class is 32 years old! Big revelation from the principals of the same school in Karnataka ....

    HIJAB CONTROVERSY TRUTH : वर्गात हिजाब घालू नये हा नियम 32 वर्ष जुना ! कर्नाटकातील त्याच विद्यालयातील प्राचार्यांचा मोठा खुलासा …

    • कर्नाटकातील ‘त्या’ महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा खुलासा.

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : मुली वर्गात मागील 32 वर्षांपासून बुरखा घालत नाहीत. मग त्या दिवशी नेमके काय घडले, हे समजत नाही, अशी प्रतिक्रिया कर्नाटकातील ‘ गोव्हर्नमेन्ट पियु कॉलेज फॉर गर्ल्स, उडुपी’ चे प्राचार्य रुद्राय्या यांनी दिली.HIJAB CONTROVERSY TRUTH: This rule of not wearing hijab in class is 32 years old! Big revelation from the principals of the same school in Karnataka …

    संपूर्ण देशात तणावाचे वातावरण निर्माण करणाऱ्या कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत. हे प्रकरण कर्नाटकच्या उडुपी येथील एका महाविद्यालयातून सुरु झाले. आता या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एका खाजगी वृत्त संस्थेशी बोलताना धक्कादायक खुलासा केला.

     

    प्राचार्य म्हणाले, ” आमच्या विद्यालयात मुस्लिम विद्यार्थनींना कॉलेजच्या कॅम्पस मध्ये हिजाब वापरण्याची परवानगी आहे, पण वर्गात मात्र हिजाबला परवानगी नाही. हा नियम मागील 32 वर्षांपासून अमलात आहे. त्या दिवशी नेमके काय घडले. विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याचा आग्रह का धरला, हा विषयी इतका का पेटला, हे अजून आम्हाला समजलेले नाही.”

    ते म्हणाले ” आमचे विद्यालय फक्त मुलींसाठीचे विद्यालय आहे. इथे येणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. पण आतापर्यंत असा वाद इथे कधीच झाला नाही.”

     

    HIJAB CONTROVERSY TRUTH: This rule of not wearing hijab in class is 32 years old! Big revelation from the principals of the same school in Karnataka …

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार