• Download App
    He went to think about the environment and lost his girlfriend even after giving her a diamond ring worth Rs 15 lakh

    पर्यावरणाचा विचार करायला गेला अन् १५ लाखांच्या हिऱ्याची अंगठी देऊनही मैत्रिणीला गमावून बसला

    पर्यावरणाचा विचार करायला गेला आणि पंधरा लाख रुपये खर्च करूनही मैत्रिणीला खुश करता आले नाही. कारण त्याने मैत्रिणीशी साखरपुडा करण्यासाठी १४ हजार पौंडांची म्हणजे सुमारे १५ लाख रुपयांची अंगठी घेतली होती. परंतु, या हिऱ्याच्या अंगठीतील हिरा हा अस्सल नाही तर प्रयोगशाळेत बनविला आहे हे समजल्यावर तिला राग आला व ती आई-वडिलांकडे राहू लागली. He went to think about the environment and lost his girlfriend even after giving her a diamond ring worth Rs 15 lakh


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पर्यावरणाचा विचार करायला गेला आणि पंधरा लाख रुपये खर्च करूनही मैत्रिणीला खुश करता आले नाही. कारण त्याने मैत्रिणीशी साखरपुडा करण्यासाठी १४ हजार पौंडांची म्हणजे सुमारे १५ लाख रुपयांची अंगठी घेतली होती. परंतु, या हिऱ्याच्या अंगठीतील हिरा हा अस्सल नाही तर प्रयोगशाळेत बनविला आहे हे समजल्यावर तिला राग आला व ती आई-वडिलांकडे राहू लागली.

    इंग्लंडमधील एका तरुणाने सोशल मीडियावर लिहिले आहे की, मी मैत्रिणीला १५ लाख रुपयांची अंगठी भेट दिली तर मी काय चूक केली? मी माज्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी अंगठी भेट दिली होती. अंगठीतील हिरा अस्सल नसून प्रयोगशाळेत बनवलेला आहे. मी या अंगठीवर एवढा पैसा खर्च केला हे ऐकून तिला आधी धक्का बसला.



    एवढ्या पैशात मी ३.६ कॅरेटचा एवढा मोठा हिरा कसा विकत घेऊ शकलो याची तिला शंकाही येऊ लागली. त्यानंतर मैत्रिणीने मला म्हटले की, तिला त्या अंगठीसोबत मिळालेले डायमंड सर्टिफिकेट बघायचे आहे. ती जास्तच विचारपूस करीत आहे, असे दिसल्यावर मी तिला सांगितले की, तो हिरा अस्सल नाही तर प्रयोगशाळेत बनवलेला आहे.

    पर्यावरणाची हानी होते म्हणून मी अस्सल हिरा विकत घेतला नाही. हे ऐकून मैत्रीण खूपच नाराज झाली. मी तिच्यासाठी अस्सल हिरा आणला नाही हे सांगून ती तिच्या पालकांकडे राहायला निघून गेली, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे.

    He went to think about the environment and lost his girlfriend even after giving her a diamond ring worth Rs 15 lakh

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??