लग्न लागल्यावर काही काही तासातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आवळगाव येथे घडली. या करुण घटनेने लोकांना धक्का बसला आहे. Grooms death on the day of marriage
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : लग्न झाल्यावर एका तासातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आवळगाव येथे घडली. या करुण घटनेने लोकांना धक्का बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील नाजूक पोहनकर यांचा विवाह ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील दीपाली नामक युवतीशी गुरुवारी ठरला होता. नाजूक हे मोजकेच वऱ्हाडी घेऊन लग्नासाठी आवळगावला आले होते.
सकाळी 11.30 वाजता आनंदी वातावरणात नाजूक व दीपालीचा विवाह सोहळा पार पडला. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रितीरिवाजानुसार नवरदेव वधूला स्वगावी नेण्यासाठी वधूसह मोटारीत बसला. त्यावेळी अचानक नवदेवाची प्रकृती बिघडली. लगेच उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलविण्यात आले .
डॉक्टरने त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्याचा सल्ला दिला. ब्रह्मपुरी वरून आरमोरीला नेत असता रस्त्यातच नवरदेवाची प्राणज्योत मालवली. ही वार्ता एकताच सहजीवनाचे स्वप्न रंगवत असलेल्या दीपालीच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला.
Grooms death on the day of marriage
इतर बातम्या
- ISRO शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या विरोधात खटला भरणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा; सुप्रिम कोर्टाचे आदेश
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दीड हजार स्वयंसेवकांचे कुंभमेळ्यामध्ये योगदान , विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्य ; गर्दी, वाहतूक नियंत्रणासाठी भरीव मदत
- NIA कडून लष्कर ए तैयबाचे पश्चिम बंगाल – काश्मीर यांचे जिहादी भरती कनेक्शन expose; रिक्रुटिंग एजंटला काश्मीरमधून अटक
- पाकिस्तानच्या मॉडस ऑपरेंडीमध्ये बदल; आता दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी कव्हर फायरिंग; भारताचेही नव्या स्ट्रॅटेजीने प्रत्युत्तर
- विमानप्रवाशांना कोरोनाची मोठी धास्ती, प्रवाशांची संख्या आली अवघ्या दोन लाखांवर