• Download App
    आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरे यांचे मनसुबे देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तरDevendra fadnavis on uddhav thackeray says he is trying to change constitution

    आंबेडकरांची घटना बदलण्याचे उद्धव ठाकरे यांचे मनसुबे देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था

    मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
    शिवसेनेचा दसरा मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवरते आज नागपूरात माध्यमांशी बोलत होते. Devendra fadnavis on uddhav thackeray says he is trying to change constitution

    फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावं की त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण केली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं.

    सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं? मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”.

    फडणवीस पुढे म्हणाले, “काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं सांगितलं. म्हणजे काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. काहीही झालं तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन आणि तशाच डाव्या विचारांच्या काही पक्षांच्या सोबतीने हा जो मनसुबा तुम्ही रचताय, तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही”.

    – आंबेडकरांची घटना बदलण्याचे ठाकरे यांचे मनसुबे

    – जनतेने भाजपला नव्हे काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं

    – काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारून तुम्हाला वरपास केले

    – महाराष्ट्राचा बंगाल आम्ही होऊ देणार नाही

    – मुख्यमंत्रीपदी असताना इतिहास का उगाळता ?

    – मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा आता पूर्ण झाली

    – अन्य शिवसैनकाला मुख्यमंत्री करता आले असते
    – नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं?

     

    Devendra fadnavis on uddhav thackeray says he is trying to change constitution

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…