• Download App
    महाराष्ट्रात काय दिवे लावले, शेतकऱ्यांना २५ ते ५० हजार रुपयांचे आश्वासन दिले पण फुटकी कवडी दिली नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप | The Focus India

    महाराष्ट्रात काय दिवे लावले, शेतकऱ्यांना २५ ते ५० हजार रुपयांचे आश्वासन दिले पण फुटकी कवडी दिली नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय चालू हे बोलत असतात. महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात एक फुटकी कवडीही दिलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय हे बोलत असतात. महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले, प्रत्यक्षात मात्र एक फुटकी कवडीही दिलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    Devendra Fadnavis alleges Maharashtra Government

    Devendra Fadnavis alleges Maharashtra Government

    फडणवीस म्हणाले की, बंगल्यांच्या नूतनीकरणाची कामे ही सुरू असतात. बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्च कमीत कमी पैशात करायला पाहिजे. मात्र शेतकऱ्यांना देखील मदत करायला हवी. या सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी केला.

    Related posts

    राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!; फडणवीसांनी मारली पाचर

    शरद पवारांचा “डाव” काँग्रेसने ओळखला, म्हणूनच घातला त्यांच्या नावाला खोडा!!

    पवारांची “डबल गेम”; एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवरच जबाबदारी ढकलली!!