- तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे संतापजनक विधान !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही विखारी टीका !
- हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करणारे तेलंगाणाचे मुख्यमंत्री अन्य धर्मियांच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत.
- बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात मुख्यमंत्रीपदासारख्या एका महत्त्वपूर्ण घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती हिंदु धर्माचा अवमान करते.Controversial Statement : KCR termed BJP leaders as a bunch of ‘vedhavalu (idiots)’ and said the saffron flag should be dro-wned in the Bay of Bengal
विशेष प्रतिनिधी
भाग्यनगर (तेलंगाणा) : राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारला बंगालच्या खाडीत फेकून देण्याचे जनतेला आवाहन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘भाजपमधील नेते हे मूर्खांचा समूह असून भगव्या ध्वजाला बंगालच्या खाडीत बुडवायला हवे’, असे संतापजनक विधानही त्यांनी केले. ते वनापार्थी जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.Controversial Statement : KCR termed BJP leaders as a bunch of ‘vedhavalu (idiots)’ and said the saffron flag should be dro-wned in the Bay of Bengal
राव यांनी भाजपाला ‘वेधवालु (मूर्ख)’ म्हणून संबोधले आणि भगवा ध्वज बंगालच्या उपसागरात फडकवायला हवा असे म्हटले
धर्मांध शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. बुद्धिजीवी आणि लोकांनी या द्वेषाच्या राजकारणाचा विचार करून देशाच्या अखंडतेचे रक्षण केले पाहिजे, असे त्यांनी एका जाहीर सभेत सांगितले.
राव म्हणाले की, भाजप (अल्पसंख्याकांविरुद्ध) करत असलेल्या द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध जनतेने सावध राहिले पाहिजे. ते म्हणाले, “भाजपच्या (जातीय) विषारी राजकारणावर गावागावात चर्चा घडवून आणली पाहिजे.”
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की,
१. मोदी यांचा मूर्खपणा आणि हट्टीपणा देशाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत आहे.
२. धर्मांध शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
३. भाजप हा द्वेषाचे राजकारण करत असल्याने जनतेने त्याच्यापासून सावध रहावे.