सकाळी नाश्ता केला की शरीरासाठी त्यातही मेंदूसाठी सकाळी पटकन उर्जा मिळते. मात्र त्याहीपेक्षा टाइप-२ चा मधुमेह असणाऱ्यांसाठी तो अतिशय लाभदायक असल्याचे तेल अविव विद्यापीठातील तज्ज्ञांच्या नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. संशोधन गटाने केलेल्या अभ्यासात नवी रंजक माहिती समोर आली आहे. आपल्या देशातील मधुमेहींची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हे संशोधन मोलाचे व महत्वाचे आहे.Breakfast is a very important meal – it can either make or break your day.
नव्या संशोधनानुसार टाइप-२ पद्धतीचा मधुमेह असणाऱ्यांनी दिवसभरात तीन टप्प्यांत भोजन करणे आवश्यसक आहे. यामध्ये सकाळचा पोटभर नाश्ताह, साधारण जेवण आणि रात्रीचा मितआहार असावा. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतात. यामुळे इन्शुलिनचे कमी प्रमाणात लागते, त्याचबरोबर वजनही नियंत्रणात राहते. या अभ्यासासाठी टाइप-२ चा मधुमेह असलेल्या ५० ते ७० वयोगटातील ११ महिला व १८ पुरुषांची निवड करण्यात आली. त्यांना योग्य प्रमाणात आहार ठरवून देण्यात आला.
तीन महिन्यांनंतर या रुग्णांना कमी प्रमाणात इन्शुलिन लागल्याचे स्पष्ट झाले. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आहार आवश्यतक आहे असे या अभ्यासगटातील संधोधकांचे ठाम मत आहे. सकाळी नाश्ताी करण्याला आपल्याकडे फारसे महत्त्व दिले जात नाही. इंग्रजीमध्ये नाश्त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. याचा अर्थ रात्री तुम्ही जेवल्यानंतर झोपता.
दुसऱ्या दवशी सकाळी उठेपर्यंत आपण काही खाल्लेले नसते. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत सलग आठ दहा तासांचा गॅप पडलेला असतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी काही खाता त्यावेळी तो फास्टमधील ब्रेक असतो. जीवनशैलीत असे छोटे बदल केल्यानेच मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते असे मानले जाते.