• Download App
    A heartfelt tribute: Ayurvedacharya Balaji Tambe passed away in Pune भावपूर्ण श्रद्धांजलि : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन

    भावपूर्ण श्रद्धांजलि : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन

    • बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती.

    • तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे.

    • आरोग्य विषयक घडामोडींवर अत्यंत जागरुकपणे त्यांनी अनेक दशकं काम केलं. केवळ राज्यातच नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालावली .A heartfelt tribute: Ayurvedacharya Balaji Tambe passed away in Pune

    बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

    बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग आणि संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ होते. पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे ते संस्थापक होते. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे त्यांचे पुस्तक बरेच गाजले होते.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

    आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    A heartfelt tribute: Ayurvedacharya Balaji Tambe passed away in Pune

    Related posts

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टात व्हर्च्युअल सुनावणीत अश्लील व्हिडिओ चालला; स्क्रीनवर हॅकचा संदेश; मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणी थांबवली

    govinddev giri maharaj : गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची उद्या पासून नाशिककरांना तीन दिवसांची संधी!!

    Modi : मोदींनी यूपीमधील सर्वात लांब एक्सप्रेस-वेचे उद्घाटन केले; हरिद्वारशीही जोडला जाईल