• Download App
    पाकिस्तानात सिंध सरकारने हिंदूना धान्यवाटप नाकारले | The Focus India

    पाकिस्तानात सिंध सरकारने हिंदूना धान्यवाटप नाकारले

    विशेष  प्रतिनिधी

    कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लियारी, सच्चल गोथ, रिरहारी गोथ येथील हिंदू समूदायाला सिंध सरकारकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू नाकारल्या जात आहेत. ही धक्कादायक माहिती तेथील मानवाधिकार कार्यकर्ते अमजद आयुब मिर्झा यांनी उघड केली आहे. रिरहारी येथे गरीब, मजूर, कामगारांना सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून धान्यवाटप सुरू होते.

    हिंदू समूदायातील लोक तेथे धान्य घेण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे वाटप फक्त मुस्लिमांसाठी आहे तुमच्यासाठी नाही, असे सांगून त्यांना हाकलून लावण्यात आले. या अमानवी प्रकारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करून राजस्थानमार्गे सिंधमधील हिंदूंसाठी मदत पाठवावी, अशी मागणी मिर्झा यांनी केली आहे. सिंध प्रांतात ५० लाख हिंदू राहतात. त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण झाले पाहिजे, असेही मिर्झा यांनी सांगितले.

    Related posts

    नितीन नवीन बॉस, मी कार्यकर्ता; पंतप्रधान मोदींनी एका वाक्यात अधोरेखित केला भाजप मधला Generational Change!!

    फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??

    Ajitdada : म्हणे, बारामती बाराची, पराभवानंतरही अजितदादांची खुमखुमी!!