• Download App
    पाकिस्तानात सिंध सरकारने हिंदूना धान्यवाटप नाकारले | The Focus India

    पाकिस्तानात सिंध सरकारने हिंदूना धान्यवाटप नाकारले

    विशेष  प्रतिनिधी

    कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लियारी, सच्चल गोथ, रिरहारी गोथ येथील हिंदू समूदायाला सिंध सरकारकडून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू नाकारल्या जात आहेत. ही धक्कादायक माहिती तेथील मानवाधिकार कार्यकर्ते अमजद आयुब मिर्झा यांनी उघड केली आहे. रिरहारी येथे गरीब, मजूर, कामगारांना सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून धान्यवाटप सुरू होते.

    हिंदू समूदायातील लोक तेथे धान्य घेण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे वाटप फक्त मुस्लिमांसाठी आहे तुमच्यासाठी नाही, असे सांगून त्यांना हाकलून लावण्यात आले. या अमानवी प्रकारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करून राजस्थानमार्गे सिंधमधील हिंदूंसाठी मदत पाठवावी, अशी मागणी मिर्झा यांनी केली आहे. सिंध प्रांतात ५० लाख हिंदू राहतात. त्यांच्या मानवी हक्कांचे रक्षण झाले पाहिजे, असेही मिर्झा यांनी सांगितले.

    Related posts

    पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींचे नेत्यांवर उमेदवारी अर्ज नेण्यासाठी भाजप कार्यालयाच्या दारासमोर रांगेत उभे राहण्याची वेळ!!

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    संघाने सगळ्या संस्था ताब्यात घेतल्या इथपासून ते मोदींनी स्वतःच्या मर्जीतलेच निवडणूक आयुक्त नेमले, इथपर्यंत राहुल गांधींच्या आरोपांच्या फैरी!!