• Download App
    टपाल खात्याने २१ लाख लाभार्थींपर्यंत ४१२ कोटी रुपये पोहोचविले | The Focus India

    टपाल खात्याने २१ लाख लाभार्थींपर्यंत ४१२ कोटी रुपये पोहोचविले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय टपाल सेवेने कोरोना लॉकडाऊनच्या काळात बँकिंग व्यवस्थेत क्रांतीच केली आहे. २१ लाख लाभार्थींना ४१२ कोटी रुपयांची रोख रक्कम पोहोचविली आहे.

    यात प्रामुख्याने शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात जेथे लोकांची बँकेत जनधन खाती आहेत पण बँकांच्या शाखा नाहीत तेथे टपाल कर्मचाऱ्यांमार्फत लाभार्थी व्यक्तींना रोख रक्कम देण्यात आली आहे. २३ मार्च ते २१ एप्रिल पर्यंतची ही आकडेवारी आहे.

    केंद्र सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम भरली होती. ही रक्कम सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी टपाल खात्याने फोनची सेवाही उपलब्ध करवून दिली होती. फोन केल्यावर १५ ते २० मिनिटांत पोस्टमननी लाभार्थ्यांपर्यंत जाऊन रक्कम दिली. ही योजनाही अजून सुरू आहे.

    Related posts

    G7 च्या निमंत्रणावरून भारतात उगाच आरडाओरडा; कॅनडाचे भारताला निमंत्रण, पंतप्रधान मोदींचा होणार दौरा!!

    अजूनही “टाळी”, “पावले”, “फोन कॉल” पर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!

    गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाची पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची भाषा!!