• Download App
    माणसे अगोदर; मग आस्था! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांची लक्षणीय टिपण्णी... | Yogi Adityanath urged to follow corona discipline

    माणसे अगोदर; मग आस्था! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथांची लक्षणीय टिपण्णी…

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ : कोणताही धर्म असो त्यातील आस्थेपेक्षा माणूस प्रथम महत्वाचा आहे. मानवासाठी आस्था आहे, आस्थेसाठी मानव नाही. कोरोनाच्या काळात याचे भान सर्वांनी राखले पाहिजे असे स्पष्ट मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज व्यक्त केले. ते ही धर्माचार्य व साधू संताच्या बैठकीत. Yogi Adityanath urged to follow corona discipline

    हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यातील शाहीस्थानासाठी उद्या लाखो श्रद्धाळू एकत्र येत आहेत. तसेच उद्यापासून रमजानचा महिना सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर योगींच्या या वक्तव्याला विशेष महत्व आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साधू संत व धर्माचार्याची व्हीडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यात संबोधित करताना योगींनी कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्राधान्य दिले पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केले.



    त्यावेळी त्यांनी मानवजात ही महत्वाची आहे. सध्याच्या वैश्विक महामारीत मानव जातीपुढेच आव्हान निर्माण झाले आहे असे स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले. योगीजी म्हणले, सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्व साधू सतांनी आपल्या आस्था काही काळ बाजूला ठेवल्या पाहिजेत. कारण मानवासाठी आस्था आहे आस्थेसाठी मानव नाही.

    मानवजात शिल्लक रहिली नाही तर त्या आस्थेला काहीच किंमत नाही. त्यामुळे आपल्या भावनांना मुरड घालून सध्या केवळ कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याला सर्व साधूंनी प्राधान्य देण्याची गरज आहे असे स्पष्ट मत योगींनी व्यक्त केले.

    Yogi Adityanath urged to follow corona discipline


    विशेष बातम्या

     

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट

    Waqf Board : चारधाममध्ये गैर-हिंदूंना बंदीच्या समर्थनार्थ वक्फ बोर्ड; अध्यक्ष म्हणाले– श्रद्धा नसेल तर तीर्थक्षेत्रात जाण्याचा हट्ट का, प्रवेशबंदी योग्यच